अंधारयुग

By: Shashi Tharoor (Author) | Publisher: Madhushree publication

Rs. 500.00 Rs. 450.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
लोकप्रिय लेखक शशी थरूर यांनी या स्फोटक पुस्तकामध्ये ब्रिटिश राजवट भारताकरिता किती विनाशकारी होती हे तीक्ष्ण युक्तिवाद, अचूक संशोधन, आणि ते ज्याकरिता प्रसिद्ध आहेत ते बुद्धिचातुर्य यांच्या साहाय्याने उलगडून दाखवले आहे. देशातील साधनसंपत्ती ब्रिटनमध्ये नेण्यापासून ते भारतीय वस्त्रोद्योग, लोखंड उद्योग आणि जहाजबांधणी उद्योगाचा विनाश, आणि कृषी उद्योगातील नकारात्मक परिवर्तनापर्यंत, वसाहतकारांनी जितक्या विविध मार्गांनी भारताचे शोषण केले त्याची तपासणी करण्याबरोबरच, त्यांनी ब्रिटिश राजवट भारतासाठी कशी चांगली होती हे मांडणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थकांचे युक्तिवादही हाणून पाडले आहेत. ब्रिटिश राजवटीने भारताला लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि रेल्वे या गोष्टी दिल्या आणि म्हणून ती भारतासाठी फायदेशीर होती, या मुद्द्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जे थोडे खरोखरच फायदे म्हणता येतील इंग्रजी भाषा, चहा आणि क्रिकेट त्यांचा प्रत्यक्षात भारतीयांना फायदा होणे अभिप्रेतच नव्हते, तर ते मुख्यतः वसाहतकारांच्या हितासाठीच होते, हे सांगायला ते विसरत नाहीत. अत्यंत प्रभावीपणे केलेली मांडणी आणि उत्कटतेने केलेला युक्तिवाद यामुळे ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या सर्वांत वादग्रस्त कालखंडापैकी एक असलेल्या ब्रिटिश कालखंडाबद्दलचे अनेक चुकीचे समज दूर करेल यात शंका नाही.
Details

Author: Shashi Tharoor | Publisher: Madhushree publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 358