महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या युद्धनितीची, युद्धशास्त्राची आजही आवश्यकता आहे. त्यांच्यासारखा सावध राज्यकर्ता आजही देशाला आहे. त्यांच्यासारखा सावध राज्यकर्ता आजही देशाला हवा आहे. त्यासाठी आजही त्यांची युद्धनीती जाणून घेण्याची गरज आहे. डॉ. सच्चीदानंद शेवडे आणि दुर्गेश परुळेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकातुन या विषयावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे. स्वराज्याचे तोरण, शिव-समर्थ भेट, अफजलखान आणि मंत्रयुद्ध, खानाचा खात्मा, शिवरायांची घौडदौड आणि दुहेरी संकट, घोडखिंड पावन झाली, शाहिस्तेखानाकडे लक्ष देण्यापूर्वी शाहिस्तेखानास शास्त, मिर्झाराजे जयसिंहाची स्वारी, पुरंदरचा तह, शिवराय आग्र्याला जातात, शिवराय नजरकैदेतून पळाले, शिवरायांची युद्धनीती या प्रकरणांतून युद्धशास्त्र समजू लागते. राष्ट्रउभारणी आणि राष्ट्राचं जतन यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते.
Author: Sacchidanand Shevade | Publisher: Navchaitanya Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 232