Description
छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय धैर्याने आणि असामान्य निष्ठेने परकीय मोगली सत्तेशी ह्यातभर झुंज दिली. शिवरायाचा हा लढा ताराराणीने नंतर चालू ठेवला. हा लढा होता स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी ! ताराराणीने देशभक्तीचे कंकण हाती बांधून अन्यायी, जुलमी मोगल सम्राट औरंगजेबाशी झुंज दिली. म्हणूनच ताराराणी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात कधीही न पुसला जाणारा सुवर्ण ठसा उमटवून गेली आहे. ताराराणीची राष्ट्रनिष्ठा तर प्रखर होतीच, शिवाय तिचे युध्दकौशल्य आणि राजकीय डावपेच थक्क करून सोडणारे होते!
Details
Author: Vasudha Pawar | Publisher: Manovikas Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 202